Navratri Information In Marathi | नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती

Navratri Information In Marathi:– नमस्कार मित्रानो estartupIdea मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे, आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती.

Navratri Information In Marathi

मित्रानो नवरात्री का साजरी केली जाते तुम्हला माहित आहे कि तुम्ही पण त्याच लोकं मध्ये आहे ज्यांना अजून सुद्धा नवरात्री का मानवली जाते आणि नवरात्री चा इतिहास काय आहे खरच आपल्याला माहित आहे का? जर माहित नसेल तर आज आपण जाणून घेऊया तर चला सुरवात करूया.

मित्रानो आपल्या हिंदू धर्मात मध्ये आपण कोणतेही सण साजरा करतो, त्या सण चा इतिहास काय आहे आणि आपण कशासाठी करतो हेच खरं तर माहित नसत.

म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत मित्रानो माहिती पूर्ण वाचा आम्हचा हेतू कोण्हाची हि भावना दुखवण्याचा नाही, माहिती मध्ये काही चुका असल्यास आम्हला ई-मेल करा आम्ही त्यास दुरुस्त करू.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक सण उत्सव मोठ्या जलोषाने आणि आनंदात साजरा केल्या जाते त्याच पैकी नवरात्र हा देवी चा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो, गणपती बाप्पाच्या विसर्जन नंतर वेध लागतात ते नवरात्री चे, त्यावेळी मधील पितृ पंधरवडा कधी संपतो ते कळत च नाही.

अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरवात होते या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हटले जाते शारदीय म्हण्याचे कारण इतकेच कि हे शरद ऋतू च्या परभी येते म्हणून यास शारद नवरात्र असे म्हटले जाते.

दसरा सणाची संपूर्ण माहिती

नवरात्री च्या पहिल्या च दिवशी घटस्थापना केली जाते तसेच सार्वजनिक मंडळमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते, नटरात्री नऊ दिवस देवीची पूजा आणि आरती तसेच देवीची सेवा हि मनोभावाने केली जाते, घातसथपणा करताना देवी समोर घट उभारला जातो, त्यामध्ये एका टोपल्या मध्ये काळी माती घेऊन त्या माती मध्ये नऊ धान्य पेरली जातात आणि त्या माती मध्ये एक पाण्याने भरलेले मडके ठेवले जाते आणि त्या मडक्यावर उड्याची पाने ठेऊन त्यावर नारळ ठेवला जातो आणि घाटावर च पाच फळे बांधली जातात

नवरात्र च्या पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानाची माळ करून घालतात, व त्यानंतर घटाला तिळाच्या फुलाची किंवा झेंडू च्या फुलाची माळ घालतात.

करवा चौथ व्रत

नवरात्र मध्ये नऊ दिवस देवी समोर अखंड जळत दिवा तेलात ठेवला जातो, सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करतात, आणि बरेच लोक नऊ दिवस पायात काही न घालता अनवाणी राहून आणि उपवास धरून हे देवीची व्रत पूर्ण करतात, आणि काही जण घट बसवण्याच्या दिवशी आणि घट उठवण्याच्या दसऱ्याच्या दिवशी उपवास करतात.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी होम हवन केले जाते, सार्वजनिक मंडळे हे ह्या दिवशी भजन कीर्तन किंवा दांडिया या कार्यक्रमाचा आयोजन करतात.

तसेच नवरात्राच्या सातव्या दिवशी घटाला कडकणावत आणि या कडकणावत सोबत घेतला पिठाची वेणी फणी,कंगवा , मंगळसूत्र जोडव्या, असे संपूर्ण स्त्री चा साज बांधला जातो.

नवरात्री च्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी आणि आठव्या दिवशी महाअष्टमी तर नव्या दिवसाला महानवमी असेसुद्धा म्हटले जाते, नवरात्राची चे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साडी नेसली जाते आणि देवी प्रमाणे सर्व स्त्रीयाही नऊ दिवस वेगवेगळ्या साड्या परिधान करून देवीची मनोभावाने पूजा करतात.

दरवषी चे हे नऊ दिवस हे धर्म शात्र्य ने ठरवले आहे त्यानुसार देवीला त्या त्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. मित्रांनो आता आपण जाणून घेऊयानवरात्री का साजरी केली जाते

नाताळ मराठी निबंध

नवरात्री का साजरी केली जाते?

मित्रानो एकेकाळी देवीने नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक राक्षसाच्या वध केला तसेच महिषासुराचा वध केला म्हणूच देवीला महिषासुरवर्धिनी असेही सुद्धा म्हटले जाते आणि नवरात्री मध्ये देवी साठी भक्तजन जागोजागी मंडप उभे करतात आणि त्याच बरोबर त्या मंडपाची सजावट आणि देखावे सुध्या उभारले जातात ज्यातून लोकांना काही संदेश पोहचावा.

आणि या नऊ दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते जसे गरबा, दांडिया या पद्धतीने कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमात लहान ते मोठ्या पर्यंत चे लोक सुद्धा सहभागही होतात. आशा प्रकारे सगळी कडे नऊ दिवस उत्साह आणि आंदीमय वातावरण असते.

नवत्राच्या नऊ दिवस काही मंडळ तसेच काही सोसायटी मध्ये बोडल्याचे म्हणजे हादगा चे आयोजन केले जाते आणि एका पाटावर हत्ती ची प्रतिमा काढून तो मधोमध ठेवता आणि त्याच्या सर्व जण रिंगण करून त्याच्या भोवती हादग्यातील गाणी म्हणतात. आणि सर्व जण आपापल्या घरून हदल्याची खिरापत आणतात आणि बोडला झाल्यानंतर ते एकमेकांना ओळखला सांगतात आणि त्यानंतर सर्व जण मिळून ते खिरापत खातात.

ह्या नवत्राच्या नऊ दिवसामध्ये सर्व देवीच्या मंदिरामध्ये खूप गर्दी बघायला मिळते, आणि सर्व महिला सकाळी लवकर उठून जवळच्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जातात, बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये महिलांच्या हस्ते महाअयोजन केले जाते, आणि ठिकाणी देवीच्या मंदीर समोर यात्रा भरते.

मित्रानो आता आपण जाणून घेऊया जोगवा काय आहे
मित्रानो देवीच्या या नौरात्र मध्ये देवीचे भक्त जोगवा मागतात, किमान पाच घरी जाऊन तांदूळ आणि पीठ मागतात आणि त्यावर आपला उपवास सोडवणे यालाच जोगवा असे म्हणतात,

मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा नवरात्री या मध्ये हा जोगवा मागितला जातो, देवीचे भक्तगण आपल्या गळ्यात कवड्याची माळ घालून जोगवा मागण्यासाठी जातात

विजयादशमी म्हणजे काय?

विजयादशमी म्हणजे काय हे समजून घेऊया अश्विन शुद्ध दशमी लाच विजयादशमी असे म्हटले जाते नवत्राच्या शेवट च्या दिवशी येते ते विजया दशमी आणि हो विजयादशमी दसरा असे सुद्धा म्हणतात ,
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महतव आहे दसऱ्याच्या नव्यादिवशी स्वप्तमी असे हि सुद्धा म्हणतात ,
दसरा हा विजयाचे प्रतीक आहे , म्हणूच याला विजया दशमी असे म्हणतात , रामाने नऊ दिवस उपवास करून, अधिमायाची म्हजेच देवीची उपासना केली आणि या देवीच्या कृपेने रामाने रावणाचा वध केला, म्हणूनच या सणाला विजयादशमी असे म्हटले जाते.


FAQ’s

2023 मध्ये नवरात्रि केव्हा आहे?

या वर्षी नवरात्र 15 ऑक्टोबर ला आणि गटसथपणा ह्या दिवशी राहील ते 24 ऑक्टोबर पर्यंत.

नवरात्र का साजरी केली जाते?

एकेकाळी देवीने नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक राक्षसाच्या वध केला तसेच महिषासुराचा वध केला म्हणूच देवीला महिषासुरवर्धिनी असेही सुद्धा म्हटले जाते .

विजयादशमी म्हणजे काय?

अश्विन शुद्ध दशमी लाच विजयादशमी असे म्हटले जाते नवत्राच्या शेवट च्या दिवशी येते ते विजया दशमी आणि हो विजयादशमी दसरा असे सुद्धा म्हणतात.


हे सुद्धा वाचा :

करवा चौथ व्रत | Karva Chauth Information In Marathi

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Marathi Nibandh

दसरा सणाची संपूर्ण माहिती | Dussehra Information In Marathi

हे पण वाचा

close