Vinoba Bhave Quotes in Marathi
माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा
“जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.”
प्रेम करणे हि एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे.
यशस्वी शिक्षण हा
यशस्वी जीवनाचा पाया आहे.
दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही,
सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय
त्या कामाला आरंभ न करणे आणि
सुरु केलेले काम पूर्ण करूनच
हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.
ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात
हिम्मत आहे कि नाही
ह्याची कसोटी घेत असतो.
विद्येचे चांगले फळ म्हणजे
उत्तम चारित्र्य आणि सदाचार.